Category Archives: घडामोडी

नोटाबंदीविरोधात बिगुल मजदूर दस्ताची जनजागृती मोहीम

अशा वेळी लोकांच्या मनातील असंतोषाला वाचा फोडण्यासाठी तसेच सरकारच्या या निर्णयाचे खरे स्वरूप लोकांसमोर ठेवण्यासाठी बिगुल मजदूर दस्ता, नौजवान भारत सभा या संघटनांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सरकारविरोधी जनजागृती मोहीम सुरू केली. मुंबई, अहमदनगर, दिल्ली, चण्डीगढ़, लुधियाना, पटना, सिरसा, कैथल, लखनऊ, गोरखपुर, इलाहाबाद, गाजियाबाद इत्यादी ठिकाणी लाखो पत्रके वितरित करण्यात आली, तसेच सरकारच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

रोहितच्या संस्थात्मक हत्येचा देशभरातून निषेध

हैदराबाद केंद्रिय विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येने देशभरातील प्रगतिशील विद्यार्थी आणि संघटनांना रस्त्यावर उतरायला भाग पाडले. १७ जानेवारीपासून आतापर्यंत असंख्य निदर्शने झाली आहेत, आणि अजूनही सुरू आहेत. बिगुल मजदूर दस्ता, दिशा छात्र संगठन, अखिल भारतीय जातिविरोधी मंच, नौजवान भारत सभा आणि युसीडीई आदी संघटनांनीसुद्धा या मुद्यावर विद्यार्थी आणि तरुणांना घेऊन वेगवेगळ्या भागांमध्ये जबरदस्त प्रतिरोध व्यक्त केला.

मानखुर्द (मुंबई) येथे शहीद भगतसिंह पुस्तकालयाचे उद्घाटन

आपल्या समृद्ध देशातील बहुसंख्य जनता आजसुद्धा गरीबी, बेरोजगारी आणि भुकेची बळी ठरते आहे कारण संसाधनांवर काही मूठभर भांडवलदार मांड ठोकून बसले आहेत. ते आपल्या नफ्यासाठी कष्टकऱ्यांना दिवसरात्र राबवत असतात. आज टीव्ही, सिनेमा उद्योग, इंटरनेटपासून सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे लहान मुले व तरुणांना स्वार्थी, हिंसक आणि विकृत बनवणाऱ्या गोष्टी मनोरंजनाच्या नावाखाली देत आहेत. यामुळे समाजात वेगवेगळ्या विकृती, अंधविश्वास पसरत आहेत. या नफेखोर व्यवस्थेला पर्याय उभा करण्याच्या दीर्घ लढ्यासाठी तरुणांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ आणि समृद्ध असणे गरजेचे आहे. निरोगी मनोरंजनाबरोबरच लहान मुले व तरुणांमध्ये उच्च जीवनमूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे. म्हणूनच , वैज्ञानिक विचार देणारी तसेच सामान्य लोकांच्या आयुष्याचे वास्तव व परिवर्तनाचा मार्ग यांच्याशी वाचकांचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे.

सुनपेडमधील बर्बर घटनेच्या विरोधात मुंबईत निदर्शने

दलितांचे पुढारीपण मिरवणारे रामदास आठवले, मायावती, रामविलास पासवान यांसारखे नेते वास्तवात गरीब दलितांचे शत्रू आहेत. यांना दलितांची आठवण फक्त निवडणूक तोंडावर येताच येते. बिहार निवडणुकीच्या तोंडावर दलितांना चुचकारण्यासाठी भाजप नेते मुंबईत आंबेडकर स्मारकाची पायाभरणी करून आपण दलितांचे उद्धारक असल्याचे दाखवतात त्यावेळी रामदास आठवलेंसारखे नेतेसुद्धा त्यांच्या या नाटकात सहभागी होऊन दलितांची भयंकर दिशाभूल करीत असतात.

मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ दिल्लीतही महाराष्ट्र भवनसमोर निदर्शन

दि. ७ जुलै रोजी नौजवान भारत सभेने मुंबईत १७ जूनला झालेल्या मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ दिल्लीतील महाराष्ट्र भवनसमोर निदर्शन केले. नौजवान भारत सभातर्फे बोलताना सनी यांनी सांगितले की सरकारच्या अनास्थेचा जोरदार निषेध झाला पाहिजे. मृतांच्या कुटुंबियांना मदत देणे टाळण्यासाठी सरकार मृतांचा आकडादेखील चुकीचा सांगत आहे, मुंबईत झालेल्या निषेधानंतर सरकारने जाहीर केलेली प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत लोकांपर्यंत पोहोचविण्यातही सरकार दिरंगाई करीत आहे व पीडितांचे बँक खाते नसल्याचे कारण देत टाळाटाळ करीत आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर दारूचा व्यापार करणाऱ्यांनासुद्धा पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे.