23 मार्च शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी संघटनांकडून देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन
आज आपल्याला विविध मार्गांनी आपल्या शहीद क्रांतिकारकांचा वारसा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जावा लागेल. शहीदांच्या स्वप्नातला भारत अजूनही बनलेला नाहीये. आपल्या देशात जो कामगार कष्टकरी वर्ग त्याच्या मेहनतीने या देशाला चालवतो तो दोन वेळेच्या अन्नाला सुद्धा मोताद आहे. त्याला ना राहायला चांगले घर आहे, जेवायला अन्न ना शिक्षण. याच वर्गाच्या श्रमाची लूट करून या देशातला अंबानी-अडाणी सारखे बडे भांडवलदार आणि भांडवलदार वर्गाचे सर्व हिस्से दिवसेंदिवस श्रीमंत होत आहेत. आज कामगार कष्टकऱ्यांमध्येच धर्म आणि जातीच्या नावाने फूट पाडण्याचे काम केले जात आहे. ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर आज भारताला शासक वर्ग खूप चतुराईने करत आहे. अशा वेळेस या सर्व क्रांतिकारकांनी जो संदेश दिला होता तो आपल्याला प्रत्येक वस्तीपर्यंत, कारखान्यापर्यंत पोहोचवावाच लागेल. म्हणून आज गरज आहे ती या देशातल्या युवकांनी कामगार कष्टकऱ्यांनी संघटीत होण्याची. तेव्हाच आपण क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत बनवू शकू.