रेल्वेभरती प्रक्रियेविरोधात बिहार, उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन
परीक्षेच्या प्रक्रियेतील एकूणच ढिसाळपणा (ही 2019 ची परीक्षा झाली 2020 मध्ये आणि पहिल्या टप्प्याचा निकाल लागला 2022 मध्ये!), प्रक्रियेत झालेले घोटाळे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध विद्यार्थी संघटना आणि स्वयंस्फूर्त विद्यार्थ्यांनी बिहार बंदचे सुद्धा आवाहन केले होते.











