युद्धाची विभीषिका आणि शरणार्थ्यांचे भीषण संकट
जगाच्या विभिन्न भागांमध्ये राहणाऱ्या कामगार वर्गाची शरणार्थ्यांप्रति भूमिका मित्रत्त्वाची असायला हवी कारण हे शरणार्थीसुद्धा कामगार वर्गाचाच एक भाग आहेत. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा अत्याचारांच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. कामगार वर्गाने आंतरराष्ट्रीय भावनेचे दर्शन घडवीत प्रत्येक देशात शरणार्थ्यांजच्या हक्कांसाठी लढले पाहिजे तसेच शरणार्थ्यांमध्ये कामगार वर्गाचे ऐतिहासिक उत्तरदायित्वाचे, म्हणजेच भांडवलशाहीचे उच्चाटन आणि समाजवादाची स्थापनेचे विचार घेऊन गेले पाहिजे, आणि शरणार्थ्यांच्या दुर्दशेचा शेवटसुद्धा सर्वहारा क्रांतीतच दडलेला आहे, हेसुद्धा त्यांना समजावले पाहिजे.








