कोरोना लशीच्या नावाने जनतेच्या फसवणुकीचे राजकारण: नफ्यासाठी जनतेला बनवले ‘गिनी पिग’
कोरोना आजाराची सुरुवात झाली तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की लस येण्यास 18 महिने तरी लागतील. पण लस मात्र एका वर्षाच्या आतच बाजारात आली आहे. भारतात सिरम संस्था, पुणे च्या कोवक्सिन आणि भारत बायोटेक च्या कोव्हीशिल्ड ह्या लसीना आपत्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी देण्यात आली, म्हणजेच क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण न करता देखील त्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली. भारतात लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत 3 लाख लोकांना लस टोचल्यानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या फर्म ने जाहीर केले की पूर्वीचा काही जुना, दीर्घकाळ असणारा आजार असल्यास लस टोचून घेऊ नये, हे म्हणजे जनतेला ‘गिनी पिग’ बनवणेच झाले.










