Category Archives: Web only addition

Suicide Factory – Cut-throat competition, rising unemployment and the coaching industry

Ever since the Neoliberal policies were introduced in the early 90s, all governments have continuously reduced their expenditure on education. As government spending kept on declining, with most of the population unable to afford private schools with high fees, the outcome has been the abysmal state of education in the country.

कॉंग्रेसचे “सॉफ्ट हिंदुत्व”: फक्त धर्मवादी फॅशिझमच्या वाढीला पोषक!

भाजप-आरएसएसने राज्य यंत्रणा, संघ परिवाराचे कार्यकर्ते आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांतील त्यांच्या भोपूंचा वापर करून, 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जमवाजमव सुरू केली  तेव्हापासून  इतर निवडणूकबाज पक्ष सुद्धा त्यांची हिंदू अस्मिता सिद्ध करण्यात लागले आहेत. आपचे केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यांना संपूर्ण दिल्लीत सुंदरकांड आणि हनुमान चालीसा कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले, तर ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉरच्या अनावरणाची योजना जाहीर केली आणि तृणमूलच्या ममता बॅनर्जी कोलकाता येथील काली मंदिराला भेट दिली. या सर्व गोंधळात महागाई आणि बेरोजगारी या समस्यांना राजकीय मोटारीच्या चर्चाविश्वात शेवटच्या सीटवर ढकलले गेले आहे.

पोस्ट ऑफिस आणि टेलिकॉम बिल! जनतेच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर भाजपचा घाव!

जनतेचा आवाज दाबण्याचे  अनेक उपाय भाजप सरकारने नियोजले आहेत त्यातील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे इंटरनेट शटडाऊन करणे, दूरसंचार सुविधा बंद करणे, वाटेल त्या व्यक्तीची झडती घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावणे त्यांना अनियमित काळापर्यंत तुरुंगात डांबणे.

बेरोजगारीच्या दरीमध्ये लाखोंच्या संख्येने ढकलले जात आहे तरुण

बेरोजगारी हा तरुण पिढीसमोरचा यक्ष प्रश्न बनला आहे. नोकऱ्यांच्या बाजारात स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी आज प्रत्येक जण कोल्हूच्या बैलाप्रमाणे राबत आहे. लाखो तरुणांसाठी काही शे नोकऱ्या काढून रोजगार देण्याच्या नावाखाली सरकार तरुणांचा वेळ-पैसा-मेहनत वाया घालवून त्यांना निराशेच्या गर्त्यात ढकलत आहे. ओला-उबर-झोमॅटो, नेटवर्क मार्केटिंग, सेल्समन, हातगाडी, वडापाव-भजीच्या हातगाड्या, सिक्युरिटी सारखी कामे पदवीधरांच्या पदरी पडली आहेत, तर शिक्षण मिळू न शकणाऱ्यांच्या गर्दीने मजूर-अड्डे ओसंडून वाहत आहेत. बेरोजगारीमुळे वाढत्या असंतोषाचा फायदा घेत राज्यात आरक्षणाच्या नावाखाली नसलेल्या रोजगारांसाठी तरुणांना जाती-जातींमध्ये विभागले जात आहे. अश्या काळामध्ये अस्मितावादाच्या राजकारणाला बळी न पडता कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित झाले पाहिजे. 

बलात्कारी गुंडांना आश्रय देणारे फॅसिस्ट भाजप सरकार

2 नोव्हेंबर रोजी आय.आय.टी. बनारस हिंदू विद्यापीठात घडलेल्या बलात्काराप्रकरणी दोन महिन्यांनंतर तिघा जणांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर बलात्काराचा आरोप दाखल करण्यात आला. हे तिन्ही बलात्कारी भाजपच्या आय.टी. सेलचे नेते आहेत, हे सुद्धा तपासामध्ये उघड झाले. या क्रूर अमानवीय घटनेशी जोडलेले लोक हे भाजपचे नेते आहेत, ही बातमी अजिबात आश्चर्यकारक नाही. 

जुन्या पेंशन योजनेसाठीचा संप तडजोडीत समाप्त

मार्च महिन्यात महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी केलेला संप पुन्हा एका तडजोडीत संपला आहे. महाराष्ट्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संप मागे घेतला गेला.  नवी पेन्शन योजना (‘न्यू/नॅशनल पेन्शन स्कीम’ किंवा एन.पी.एस., जिला थट्टेने ‘नो पेन्शन स्कीम’ असेही म्हटले जाते) ज्यांना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता 35 संघटनांनी मिळून हा संप पुकारला होता.

महान ऑक्टोबर सर्वहारा क्रांतीचा वारसा अमर रहे!

25 ऑक्टोबर (क्रांत्योत्तर नवीन कॅलेंडर नुसार 7 नोव्हेंबर) 1917 रोजी लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या पुढाकाराने रशियातील कामगार वर्गाने भांडवलदार वर्गाची सत्ता उलथवून टाकली आणि 1871 च्या पॅरिस कम्युन नंतर पुन्हा कामगार वर्गीय सत्तेची स्थापना केली. या घटनेने ना फक्त रशियाच्या इतिहासाला नवीन वळण दिले, तर जगाच्या इतिहासावर कायमची अमिट छाप सोडली आणि इतिहासाच्या संपूर्ण कालक्रमालाच कलाटणी दिली. ऑक्टोबर क्रांतीच्या तोफगोळ्यांचे आवाज जगभर घुमले.

भांडवली शेतकरी, भांडवली जमीनदार, आडते, व्यापारी आणि मध्यस्थ कशाप्रकारे गावातील गरिबांना लुटतात?

भांडवली शेतकरी, भांडवली जमीनदार, आडते, व्यापारी आणि मध्यस्थ कशाप्रकारे गावातील गरिबांना लुटतात? – अभिनव (अनुवाद: अभिजित ) आपल्या देशात जवळपास 25 कोटी लोक शेतीमध्ये गुंतलेले आहेत. यापैकी जवळपास 14.5 कोटी…

गाझापट्टीतील एका चिमुकल्याची कविता / कविता कृष्णपल्लवी

बाबा!
मी पळू शकत नाहीये
रक्ताळलेल्या मातीने बरबटलेले माझे बूट
फारच जड झालेयत
माझे डोळे आंधळे होताहेत
आकाशातून बरसणार्‍या आगीच्या चमचमाटाने
बाबा,
माझे हे हात आता दगड दूरपर्यंत फेकू शकत नाहीत
आणि माझे पंखसुद्धा अद्याप खूप लहान आहेत