Category Archives: Slider

फासीवादापासून सुटका करून घेण्याच्या सोप्या मार्गांचे भ्रम सोडा! पुर्ण ताकदीने खऱ्या लढ्यासाठी सज्ज व्हा!!

भाजपा हिंदुत्ववादाची फक्त एक संसदीय आघाडी आहे. हिंदुत्ववाद कुठल्याही फासीवादी आंदोलनासारखेच अत्यंत प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलन आहे. हे मुख्यतः मध्यवर्गाचे सामाजिक आंदोलन आहे, ज्याच्या सोबतीला उत्पादनापासून बेदखल कामगार सुद्धा आहेत आणि ज्याला लहान-मोठ्या कुलक-शेतमालक बहुसंख्येचे – म्हणजे बुर्जुआ सत्तेच्या सर्व छोट्या-मोठ्या बहुसंख्येचे – समर्थन प्राप्त आहे. संघ परिवाराची कार्यकर्त्यांची फळी आधारित संघटनात्मक संरचना या प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलनाचे अग्रदल आहे. याला जोरदार विरोध एक क्रांतिकारी सामाजिक आंदोलनच करू शकते, ज्यावर कामगार वर्गाच्या क्रांतिकारी राजकारणाचे वर्चस्व एका केडर आधारित संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून प्रस्थापित झाले असेल. हि लढाई कशी असेल हे समजण्यासाठी जर याची तुलना सैनिकी युद्धासारख्या संघर्षाशी केली तर म्हणता येईल कि हे गनिमी काव्याचे युद्ध वा चलायमान युद्धा सारखे नसून मोर्चा बांधून लढल्या जाणाऱ्या लढाई सारखे असेल. फासिस्तांनी विभिन्न सामाजिक-सांस्कृतिक संस्थेंच्या रुपामध्ये समाजात आपली खंदके खोदून व बंकर बांधून ठेवली आहेत. आपल्यालाही आपली खंदके खोदावी लागतील आणि बंकर बनवावे लागतील.

गरीबी दूर करण्याचा एकच रस्ता – समाजवादी व्यवस्था / लेनिन

एका बाजूला संपत्ती व चैन वाढत आहे, आणि तरीही आपल्या श्रमाने जे लोक ही सर्व संपत्ती निर्माण करतात अशा लक्षावधी लोकांना दारिद्र्यात व दैन्यात जिणे कंठावे लागत आहे. शेतकरी उपासमालेनिनरीने मरत आहेत, कामगार बेकार होऊन वणवण फिरत आहेत, आणि तरीही व्यापारी लाखो पोती धान्य रशियातून परदेशी निर्यात करीत आहेत, माल विकता येत नाही, मालाला बाजारपेठ उरलेली नाही म्हणून फॅक्टऱ्यांमधले कामकाज थंडावले आहे.

गोरक्षणाचे गौडबंगाल – फासीवादाचा खरा चेहरा

एका बाजूला भाजपने कायदेशीर रूपाने कट्टरतावादी शक्तींसाठी संघटीत हिंसेचे दरवाजे उघडले आहेत आणि दुसरीकडे आर.एस.एस. आणि या सर्व फासिस्त शक्ती अनेक प्रकारच्या कॅडर-आधारित यंत्रणा, मीडिया आणि आपल्या प्रचार तंत्राद्वारे तळागाळातील स्तरावर सतत लोकांमध्ये एका ‘खोट्या चेतनेची’निर्मिती करत आहेत, जी जमावाच्या स्वरूपात हिंसेचे खेळ खेळत आहे. ‘पवित्र गाईच्या’बाबतीत अशाच अनेक खोट्या गोष्टींचा प्रचार संघ जागोजागी करत आहे. उदाहरणार्थ की सर्व हिंदू गोहत्येच्या आणि गोमांस खाण्याच्या विरोधात आहेत किंवा हिंदू संस्कृती आणि परंपरेने गोहत्येला अपवित्र मानले आहे. ही गोष्ट खरी आहे की हिंदूंमध्ये काही जाती आणि समुदाय गाईला पूज्य आणि गोहत्येला निकृष्ठ मानतात पण हे सुद्धा खरे आहे की भारतातील सर्व हिंदू समुदायांचे किंवा जातींचे आजच्या किंवा अगोदरच्या काळात असे मत नव्हते.

नवीन वर्षाचा पहिला दिवसच जातीय तणावात! जात-धर्माच्या नावाने न झगडता खरे मुद्दे उचलायला हवेत!

आज सर्व जातींमधील गरिबांना हे समजवून सांगण्याची गरज आहे की त्यांच्या हलाखीच्या अवस्थेला खरेतर दलित, मुस्लिम किंवा आदिवासी जबाबदार नाहीत तर त्यांच्या स्वत:च्या आणि इतर जातींमधील श्रीमंत लोक आहेत. जोपर्यंत कष्टकरी जनतेला हे समजणार नाही तोपर्यंत हेच होत राहील की एक जात आपले एखादे आंदोलन उभे करेल आणि त्याच्या विरोधात शासक वर्ग इतर जातींचे आंदोलन उभे करून जातीय विभाजन अजून वाढवेल. या षडयंत्राला समजणे गरजेचे आहे. या षडयंत्राचे उत्तर अस्मितावादी राजकारण आणि जातीय गोलबंदी नाही. याचे उत्तर वर्ग संघर्ष आणि वर्गीय गोलबंदी हेच आहे. या षडयंत्राचा बुरखा फाडावा लागेल आणि सर्व जातींमधील बेरोजगार, गरीब आणि कष्टकरी लोकांना संघटीत आणि एकत्रित करावे लागेल.

भीमा कोरेगाव लढाईच्या २०० वर्ष साजरीकरणाचा सोहळा – जाती-अंताची योजना अशा अस्मितावादामूळे पुढे नाही, उलट मागे जाईल!

भारतातील जनतेला कायम विभाजित ठेवण्यासाठी इंग्रजांनी जाती व्यवस्थेचा आणि धर्माचा वापर केला होता. इंग्रजांनी जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी अगदी जाणीवपूर्वक अजिबात काही खास केले नाही. अशा स्थितीत जर कोणी स्वत:ला जातीअंताचे आंदोलन म्हणत असेल (रिपब्लिकन पॅंथर) आणि कोरेगावच्या लढाईचे २०० वे वर्षे साजरे करत असेल तर स्वाभाविकच ते असेही म्हणत असतील कि इंग्रजांचे सैनिक हे जाती अंताचे शिपाई होते. वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. अशा संघटना ना जाती अंताची कुठली सांगोपांग योजना देवू शकतात, ना त्यावर दृढपणे अंमलही करू शकतात.

बेसुमार वाढती महागाई म्हणजे गरीबांच्या विरोधात सरकारचे लुटेरे युद्ध!

जोपर्यंत वस्तुंचं उत्पादन व वितरण केवळ नफा कमावण्यासाठी होत राहील तोपर्यंत महागाई दूर नाही होणार. कामगारांची मजुरी व वस्तूंच्या किमतींमध्ये एक अंतर कायम राहील. कामगारही फक्त आपल्या मजुरी वाढवण्याच्या संघर्षातून काहीच मिळवू शकणार नाहीत. कदाचित तो लढून थोडीशी मजुरी भांडवलदारांकडून वाढवून घेण्यात यशस्वी होईलही, पण भांडवलदार वस्तूंच्या किमती पुन्हा वाढवेल व आपल्याला लुटत राहील. हे सातत्यानं चालू राहील. कामगारांची मजूरी वाढवण्याच्या सोबतच मजूरीची ही संपूर्ण व्यवस्थाच नष्ट करायला आपल्याला लढावं लागेल.

बाबा राघवदास मेडिकल कॉलेज(उ.प्र.) मध्‍ये ६० हून अधिक मुलांचे हत्‍याकांड : कष्‍टकरी सामान्‍य जनतेच्‍या आरोग्‍याचा पंचनामा आणि मोदी-योगीच्‍या जुमलेबाजीचं नग्‍न वास्‍तव

जेव्‍हा काही लोक स्‍वातंत्र्याची सत्‍तरी साजरी करण्‍याची जय्यत तयारी करीत होते व सलग येणाऱ्या सुट्ट्यांची योजना आखत होते, तेव्‍हा गोरखपुर, उत्‍तरप्रदेशातल्‍या ‘बाबा राघवदास मेडीकल कॉलेज’ (बीआरडी मेडिकल कॉलेज) मध्‍ये काही आई-बाप आपल्‍या चिमुरड्यांना डोळ्यां देखत तडफडत मरताना बघत होते.

गौरी लंकेश यांच्या हत्येमागील राजकीय संदर्भ

हिंदुत्ववादी विचाराच्या परिवारामध्ये अतिशय उदारमतवादी चेहऱ्याच्या संघटनांपासून ते गुप्त पद्धतीने हत्यारांचे प्रशिक्षण देणाऱ्या संघटना सामील आहेत. दहशतवादी कारवाया करणाऱ्या किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्या अभिनव भारत ते हिंदु जनजागृती समिती सारख्या संस्था अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत.  परंतु या खुनांच्या अशाप्रकारच्या गुन्हेगारी विश्लेषणापेक्षा महत्वाचे आहे त्यांचे राजकीय विश्लेषण. कारण सामाजिक-राजकीयदृष्ट्या सक्रीय असलेल्या, हिंदुत्ववादी, फासीवादी, उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या विचारवंतांच्या या हत्या आहेत. खुन कोणीही केलेला असो, करणाऱ्यांची आणि करवणाऱ्यांची वैचारिक बैठक जास्त महत्वाची आहे. सॉक्रेटीस ते तुकाराम आणि दाभोळकर ते आता गौरी लंकेश असा पुरोगामी विचारकांच्या हत्यांचा मोठा इतिहास आहे. परंतु आजच्या काळात होत असलेल्या या हत्यांना आजच्या राजकीय चौकटीतच बघितले पाहिजे.

भारतीय समाजातील फासीवादासाठी अनुकूल परिस्थिती आणि तिचा सामाजिक आधार / फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे? – पाचवा भाग

फासीवादाच्या उत्थानाच्या ज्या मुलभूत कारणांची मीमांसा आपण केली आहे ती कारणे फासीवादाच्या उत्थानाची सामान्य कारणे असतात. ही कारणे जर्मनीमध्ये उपलब्ध होती, इटली मध्ये उपलब्ध होती आणि भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. ह्या पैकी, सामाजिक-लोकशाहीवाद्यांचा विश्वासघात आपल्यासाठी सर्वात महत्वाचे कारण आहे. भारतामध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती आहे. सी.पी.आई. आणि सी.पी.एम.च्या नेतृत्वाखाली ट्रेड युनियन आंदोलन तीच भूमिका बजावत आहे जी त्यांनी जर्मनीमध्ये बजावली होती. इथेसुद्धा संशोधनवादी आणि ट्रेड युनियनचे नेतृत्व कामगारांना सुधारवाद, अर्थवाद आणि अराजकतावादी संघाधिपत्यवादाच्या चौकटीमध्ये अडकवून ठेवण्याचे काम करत आहेत. इथे ट्रेड युनियन आंदोलन आणि सामाजिक-लोकशाहीवादी भांडवलदारांना असे अर्थवादी करार करण्यास भाग पाडू शकत नाही जे त्यांनी जर्मनी मध्ये केले होते.

त्या लढल्या! त्या जिंकल्या! दिल्लीच्या अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या लढाऊ संघर्षाचा विजयी समारोप

या संपाच्या विजयाने हे सिद्ध केलंय कि कोणताही दुरूस्तीवादी डाव्या पक्ष आणि त्याच्या ट्रेड युनियनशिवाय तसेच अन्य राजकीय पक्ष यांच्या सहभाग व सहयोगाशिवाय सुध्दा कामगार योग्य राजकीय कार्यदिशा व योग्य राजकीय नेतृत्वासह मोठ्यातील मोठ्या सरकारला हरवले जाऊ शकते. या संघर्षाने हे दाखवून दिले. आम आदमी पार्टी आणि त्याच्या नेत्यांच्या आडमुठेपणामुळेच दिल्लीतील सामान्य गरीब जनता आणि अंगणवाडीच्या २२००० हजार महिला कर्मचाऱ्यांना या संघर्षा दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला.