Category Archives: Slider

जीडीपी वाढीच्या दरात घट आणि अर्थव्यवस्थेची बिघडत चाललेली अवस्था: सर्वात जास्त मार तर कष्टकऱ्यांवरच पडत आहे!

अर्थव्यवस्थेत चालू असलेले संकट एका क्षेत्रातील नसून सर्वव्यापक संकट आहे. त्यामुळे आश्चर्य याचे नाही वाटले पाहिजे की जीडीपी वाढीच्या दरात घट झाली आहे, उलट याचे आश्चर्य वाटले पाहिजे की घट इतकी कमी कशी. एवढा वृद्धीदर हे सुद्धा एक आश्चर्यच आहे आणि आपण वर अगोदरच याच्या मोजण्याच्या पद्धतीवर काही प्रश्न उपस्थित केले होते जे याला जबाबदार असू शकतात.

पॅलेस्तिनी लोकांचा स्वातंत्र्यलढा चिरायू होवो! पॅलेस्तिनी जनतेच्या संघर्षाला साथ द्या!

काय आहे इस्त्रायल-पॅलेस्ताईनचा प्रश्न आणि जगाच्या राजकारणात तो इतका महत्वाचा का आहे? जगभरातील भांडवलदारांच्या ताब्यातील मुख्य प्रसारमाध्यमे सतत इस्त्रायलच्या बाजूने लिहिण्याचा किंवा पॅलेस्तिनी बाजू लपवण्याचा प्रयत्न करत असतात. खरेतर जगातील सर्वाधिक हिंमती आणि चिवट असा स्वातंत्र्यलढा पॅलेस्ताईनमधील लोक गेली सात दशके लढत आहेत.

मुंबईमध्‍ये अग्‍नीतांडव : दुर्घटना नाही, भांडवली व्यवस्थेचे बळी

या व्यवस्थेमुळेच आज मुंबईतील ४४ टक्के जनता झोपडपट्टीत राहण्यास बाध्य आहे. झोपडपट्टीत राहणारे कष्टकरी लोकच मुंबईला चालते ठेवण्याचे काम अहोरात्र करत असतात; मात्र बकाल जीवन, रोगराई, सुरक्षेचा अभाव त्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. गरिबांचे शोषण करून श्रीमंतांच्या तुंबड्या भरणाऱ्या या भांडवली व्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि गरीब अगदीच गरीब होत चालले आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत १ टक्के लोकांकडे ७३% संपत्ती जमा झाली आहे आणि वरच्या दहा टक्के लोकांकडे ८०% संपत्ती गोळा झाली आहे. जोपर्यंत ही व्यवस्था आहे तोपर्यंत कामगारांना ना रोजगाराची शाश्वती आहे, ना घरांची, ना अपघातांपासून सुरक्षिततेची! या व्यवस्थेला आमूलाग्र बदलून, कष्टकऱ्यांची क्रांतिकारी सत्ताच खऱ्या अर्थाने या सर्व समस्यांचे निवारण करू शकते.

फासीवादाचा सामना कसा कराल ? / फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे? – सहावा आणि शेवटचा भाग

फासीवाद आणि प्रतिक्रियावाद दहा पैकी नऊ वेळा जातीयवादी, वंशवादी, सांप्रदायिकतावादी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बुरखा ओढून येतो. तसे तर आपण सुरुवातीपासूनच बुर्झ्वा राष्ट्रवादाच्या प्रत्येक रूपाचा यथासंभव विरोध केला पाहिजे, परंतु विशेषत: फासीवादी सांस्कृतिक अंधराष्ट्रवाद कामगार वर्गाच्या सर्वात मोठ्या शत्रुंपैकी एक आहे. आपल्याला प्रत्येक पावलावर सांस्कृतिक राष्ट्रवाद, प्राचीन हिंदू राष्ट्राच्या प्रत्येक गौरवशाली मिथकाचा आणि खोट्या प्रतीकाचा विरोध करावा लागेल आणि त्यांना जनतेच्या मान्यतेमध्ये खंडित करावे लागेल. ह्यात आपल्याला विशेष मदत ह्या सांस्कृतिक राष्ट्रवाद्यांच्या इतिहासामधून मिळेल. निर्विवादपणे अंधराष्ट्रवादाचा उन्माद पसरवण्यामध्ये गुंतलेल्या ह्या संघटनांना काळा इतिहास असतो जो विश्वासघात, भ्रष्टाचार आणि पतन ह्यांनी भरलेला असतो. आपल्याला फक्त हा इतिहास जनतेपुढे मांडायचा आहे आणि त्याच्या समोर हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे “राष्ट्र” कोणते आहे ज्याबद्दल फासीवादी बोलत आहेत ते कोणत्या पद्धतीचे राष्ट्र स्थापन करू इच्छित आहेत आणि कोणाच्या हिताची सेवा करण्यासाठी आणि कोणाच्या हिताचा बळी देऊन ते हे “राष्ट्र” स्थापन करू इच्छित आहेत.

फासीवादापासून सुटका करून घेण्याच्या सोप्या मार्गांचे भ्रम सोडा! पुर्ण ताकदीने खऱ्या लढ्यासाठी सज्ज व्हा!!

भाजपा हिंदुत्ववादाची फक्त एक संसदीय आघाडी आहे. हिंदुत्ववाद कुठल्याही फासीवादी आंदोलनासारखेच अत्यंत प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलन आहे. हे मुख्यतः मध्यवर्गाचे सामाजिक आंदोलन आहे, ज्याच्या सोबतीला उत्पादनापासून बेदखल कामगार सुद्धा आहेत आणि ज्याला लहान-मोठ्या कुलक-शेतमालक बहुसंख्येचे – म्हणजे बुर्जुआ सत्तेच्या सर्व छोट्या-मोठ्या बहुसंख्येचे – समर्थन प्राप्त आहे. संघ परिवाराची कार्यकर्त्यांची फळी आधारित संघटनात्मक संरचना या प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलनाचे अग्रदल आहे. याला जोरदार विरोध एक क्रांतिकारी सामाजिक आंदोलनच करू शकते, ज्यावर कामगार वर्गाच्या क्रांतिकारी राजकारणाचे वर्चस्व एका केडर आधारित संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून प्रस्थापित झाले असेल. हि लढाई कशी असेल हे समजण्यासाठी जर याची तुलना सैनिकी युद्धासारख्या संघर्षाशी केली तर म्हणता येईल कि हे गनिमी काव्याचे युद्ध वा चलायमान युद्धा सारखे नसून मोर्चा बांधून लढल्या जाणाऱ्या लढाई सारखे असेल. फासिस्तांनी विभिन्न सामाजिक-सांस्कृतिक संस्थेंच्या रुपामध्ये समाजात आपली खंदके खोदून व बंकर बांधून ठेवली आहेत. आपल्यालाही आपली खंदके खोदावी लागतील आणि बंकर बनवावे लागतील.

गरीबी दूर करण्याचा एकच रस्ता – समाजवादी व्यवस्था / लेनिन

एका बाजूला संपत्ती व चैन वाढत आहे, आणि तरीही आपल्या श्रमाने जे लोक ही सर्व संपत्ती निर्माण करतात अशा लक्षावधी लोकांना दारिद्र्यात व दैन्यात जिणे कंठावे लागत आहे. शेतकरी उपासमालेनिनरीने मरत आहेत, कामगार बेकार होऊन वणवण फिरत आहेत, आणि तरीही व्यापारी लाखो पोती धान्य रशियातून परदेशी निर्यात करीत आहेत, माल विकता येत नाही, मालाला बाजारपेठ उरलेली नाही म्हणून फॅक्टऱ्यांमधले कामकाज थंडावले आहे.

गोरक्षणाचे गौडबंगाल – फासीवादाचा खरा चेहरा

एका बाजूला भाजपने कायदेशीर रूपाने कट्टरतावादी शक्तींसाठी संघटीत हिंसेचे दरवाजे उघडले आहेत आणि दुसरीकडे आर.एस.एस. आणि या सर्व फासिस्त शक्ती अनेक प्रकारच्या कॅडर-आधारित यंत्रणा, मीडिया आणि आपल्या प्रचार तंत्राद्वारे तळागाळातील स्तरावर सतत लोकांमध्ये एका ‘खोट्या चेतनेची’निर्मिती करत आहेत, जी जमावाच्या स्वरूपात हिंसेचे खेळ खेळत आहे. ‘पवित्र गाईच्या’बाबतीत अशाच अनेक खोट्या गोष्टींचा प्रचार संघ जागोजागी करत आहे. उदाहरणार्थ की सर्व हिंदू गोहत्येच्या आणि गोमांस खाण्याच्या विरोधात आहेत किंवा हिंदू संस्कृती आणि परंपरेने गोहत्येला अपवित्र मानले आहे. ही गोष्ट खरी आहे की हिंदूंमध्ये काही जाती आणि समुदाय गाईला पूज्य आणि गोहत्येला निकृष्ठ मानतात पण हे सुद्धा खरे आहे की भारतातील सर्व हिंदू समुदायांचे किंवा जातींचे आजच्या किंवा अगोदरच्या काळात असे मत नव्हते.

नवीन वर्षाचा पहिला दिवसच जातीय तणावात! जात-धर्माच्या नावाने न झगडता खरे मुद्दे उचलायला हवेत!

आज सर्व जातींमधील गरिबांना हे समजवून सांगण्याची गरज आहे की त्यांच्या हलाखीच्या अवस्थेला खरेतर दलित, मुस्लिम किंवा आदिवासी जबाबदार नाहीत तर त्यांच्या स्वत:च्या आणि इतर जातींमधील श्रीमंत लोक आहेत. जोपर्यंत कष्टकरी जनतेला हे समजणार नाही तोपर्यंत हेच होत राहील की एक जात आपले एखादे आंदोलन उभे करेल आणि त्याच्या विरोधात शासक वर्ग इतर जातींचे आंदोलन उभे करून जातीय विभाजन अजून वाढवेल. या षडयंत्राला समजणे गरजेचे आहे. या षडयंत्राचे उत्तर अस्मितावादी राजकारण आणि जातीय गोलबंदी नाही. याचे उत्तर वर्ग संघर्ष आणि वर्गीय गोलबंदी हेच आहे. या षडयंत्राचा बुरखा फाडावा लागेल आणि सर्व जातींमधील बेरोजगार, गरीब आणि कष्टकरी लोकांना संघटीत आणि एकत्रित करावे लागेल.

भीमा कोरेगाव लढाईच्या २०० वर्ष साजरीकरणाचा सोहळा – जाती-अंताची योजना अशा अस्मितावादामूळे पुढे नाही, उलट मागे जाईल!

भारतातील जनतेला कायम विभाजित ठेवण्यासाठी इंग्रजांनी जाती व्यवस्थेचा आणि धर्माचा वापर केला होता. इंग्रजांनी जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी अगदी जाणीवपूर्वक अजिबात काही खास केले नाही. अशा स्थितीत जर कोणी स्वत:ला जातीअंताचे आंदोलन म्हणत असेल (रिपब्लिकन पॅंथर) आणि कोरेगावच्या लढाईचे २०० वे वर्षे साजरे करत असेल तर स्वाभाविकच ते असेही म्हणत असतील कि इंग्रजांचे सैनिक हे जाती अंताचे शिपाई होते. वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. अशा संघटना ना जाती अंताची कुठली सांगोपांग योजना देवू शकतात, ना त्यावर दृढपणे अंमलही करू शकतात.

बेसुमार वाढती महागाई म्हणजे गरीबांच्या विरोधात सरकारचे लुटेरे युद्ध!

जोपर्यंत वस्तुंचं उत्पादन व वितरण केवळ नफा कमावण्यासाठी होत राहील तोपर्यंत महागाई दूर नाही होणार. कामगारांची मजुरी व वस्तूंच्या किमतींमध्ये एक अंतर कायम राहील. कामगारही फक्त आपल्या मजुरी वाढवण्याच्या संघर्षातून काहीच मिळवू शकणार नाहीत. कदाचित तो लढून थोडीशी मजुरी भांडवलदारांकडून वाढवून घेण्यात यशस्वी होईलही, पण भांडवलदार वस्तूंच्या किमती पुन्हा वाढवेल व आपल्याला लुटत राहील. हे सातत्यानं चालू राहील. कामगारांची मजूरी वाढवण्याच्या सोबतच मजूरीची ही संपूर्ण व्यवस्थाच नष्ट करायला आपल्याला लढावं लागेल.