धर्मस्थळ येथील सामूहिक दफन प्रकरण: स्त्री विरोधी, गरीब विरोधी हिंसेचा रक्तरंजित दस्तऐवज
एका दलित सफाई कामगाराने केलेल्या आरोपांनुसार, त्याला जवळपास दोन दशकांच्या कालावधीत म्हणजेच 1995 ते 2004 यादरम्यान मंदिराच्या सत्तास्थानी असलेल्या तसेच गावातील प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या लोकांकडून जीवे मारण्याची धमकी देऊन शेकडो मृतदेह पुरायला भाग पाडले गेले. यात मुख्यत्वे स्त्रिया, अल्पवयीन शाळकरी मुली यांचे मृतदेह सर्वाधिक होते तसेच ॲसिड फेकल्यामुळे चेहेरे जळालेल्या महिलांच्या मृतदेहांचा समावेश होता.













