Category Archives: संघर्षरत जनता

कॉकरोच जनता पार्टी आणि तिची लोकप्रियता: व्यवस्थेबद्दल आणि विद्यमान सरकारबद्दल भारतीय जनतेत वाढणाऱ्या संताप आणि असंतोषाची तसेच पर्यायाच्या अभावाची अभिव्यक्ती

कॉकरोच जनता पार्टीच्या लोकप्रियतेत अचानक झालेल्या वाढीचे मुख्य कारण हे आहे की, आपल्या देशातील सत्ताधारी वर्ग, त्याची राज्ययंत्रणा आणि तिचे विभिन्न अंग-उपांग कष्टकरी जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रचंड असंवेदनशील आहेत. त्यांची वृत्ती बऱ्याच अंशी क्रांतीपूर्व फ्रान्सची राणी मेरी अँटोइनेट हिच्यासारखी झाली आहे; जिने म्हटले होते: “जर लोकांना खायला भाकरी नाही आहे, तर ते केक का खात नाहीत?” त्याचप्रमाणे, भूक आणि कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या कष्टकरी वर्गाच्या मोठ्या लोकसंख्येला सांगितले जात आहे की “सब चंगा सी” “मेलोडी खाओ, खुद जान जाओ” किंवा “देश शांतता आणि विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे,” इत्यादी. दुसरीकडे, सधन उच्च-मध्यम आणि उच्च वर्ग पूर्णपणे नशेत धुंद झाला आहे. ही धुंदी आहे ‘उपभोगवादा’ची म्हणजेच अमर्याद ऐषारामाच्या संस्कृतीची; ज्यामध्ये हा वर्ग पूर्णपणे बुडालेला आहे आणि निरंतर “खाओ, पियो, ऐश करो मित्रों” या धुनवर ते अविरतपणे एक उन्मत्त नृत्य करत आहेत. सुईपासून ते विमानापर्यंत सर्व काही निर्माण करणाऱ्या आणि प्रत्येक प्रकारची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कष्टकरी वर्गाच्या वेदना आणि दुःखाची त्यांना काहीच पर्वा नाही. उलट ते त्यांची खिल्ली उडवतात. ऐश्वर्य आणि संपत्तीचे हे बीभत्स प्रदर्शन कष्टकरी जनतेच्या संयमाची कसोटी पाहणारे ठरत आहे; ही जनता आज अश्रूंच्या एका विशाल महासागरात बुडालेली आहे.

नेपाळमधील युवकांचा विद्रोह – नेपाळमधील वाढती आर्थिक असमानता, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ले यांविरोधातील आक्रोश!

भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळ मध्ये तिथल्या तरुणांनी केलेला विद्रोह अनेक कारणांनी चर्चेत राहिला. नेपाळ मध्ये घडून आलेला हा तरुणांचा विद्रोह एका अशा काळात घडून आला जो क्रांत्यांवाचून रखरखलेला असा काळ आहे. जगभरात सामान्य जनतेचे दमन, शोषण टोकाला पोहचले असून अनेक ठिकाणी याची प्रतिक्रिया म्हणून दक्षिणपंथी शासनांचा उदय झाला आहे. जगभरातील कष्टकरी जनतेच्या मुक्तीची शर्त बनली आहे ह्या साम्राज्यवादी, भांडवली शक्तींना उलथवले जाणे! त्यामुळेच पॅलेस्टाईन मधील जनतेचा मुक्तीसंघर्ष, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, इत्यादी देशांमधील जनविद्रोह सतत संघर्षरत जनतेला प्रेरित करत असतात.

मुळशी सत्याग्रह:  टाटा उद्योगाविरोधात विस्थापनविरोधी संघर्षाची कहाणी

ज्याच्या इतिहासाच्या अत्यंत कमी नोंदी सापडतात, असा मुळशी सत्याग्रह, पांडुरंग महादेव (सेनापती) बापट आणि वि. म. भुस्कुटे यांच्या नेतॄत्वात 1920च्या दशकात लढला गेला. विजनिर्मितीसाठी टाटा हायड्रोलिक कंपनी (आताचे नाव टाटा पावर) निला व मुळा नदीवर धरण बांधू पहात होती, ज्यामुळे मुळशीतील 52 गावे पाण्याखाली जाणार होती. जनतेने ब्रिटीशांनी टाटांसोबत मिळून घेतललेल्या हुकूमशाही निर्णयाविरोधात संघर्षाचा निर्णय घेतला.

पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यलढ्याशी भारतीय राज्यसत्तेची प्रतारणा!

इंग्रजांचे तळवे चाटण्यात धन्यता मानणाऱ्या, साम्राज्यवादाचे हस्तक म्हणून काम करणाऱ्या भारतातील हिंदुत्ववादी शक्ती आज सत्तेत असताना त्यांचे खरे रंग दाखवत पुन्हा एकदा नागडेपणाने अमेरिका प्रणीत साम्राज्यवादी अक्षाच्या बाजूने उभे राहत पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षात इस्रायलची भलावण करत उभ्या आहेत.

रेल्वे प्रवाशांसाठी जीवघेणी ठरणारी, सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी सरकारची नवउदारवादी धोरणे

बालासोरजवळ शालिमार कोरोमंडल एक्स्प्रेस, यशवंतपूर हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांचा झालेला  रेल्वे अपघात हा 20 वर्षांतील भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे. बालासोरजवळ शालिमार कोरोमंडल एक्स्प्रेस, यशवंतपूर हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांचा झालेला  रेल्वे अपघात हा 20 वर्षांतील भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे.

लाखोंच्या संख्येने तोडली जाताहेत कामगार-कष्टकऱ्यांची घरं!

कामगार-कष्टकऱ्यांची घरं उद्ध्वस्त करण्याच्या घटनांमध्ये 2022 पासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वेगवेगळी कारणं देऊन राज्य आणि केंद्र सरकारांनी वस्त्यान्-वस्त्या उद्ध्वस्त करून शहरांमध्ये राहणाऱ्या कामकरी जनतेला रस्त्यावर आणण्याचा घाट घातला आहे. मुख्यत्वे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये राहणाऱ्या वस्त्यांवर कारवाई करून बहुतांश लोकांना बेघर केले जात आहे आणि उघड्यावर राहण्यास भाग पाडले जात आहे

जुन्या पेंशन योजनेसाठीचा संप तडजोडीत समाप्त

मार्च महिन्यात महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी केलेला संप पुन्हा एका तडजोडीत संपला आहे. महाराष्ट्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संप मागे घेतला गेला.  नवी पेन्शन योजना (‘न्यू/नॅशनल पेन्शन स्कीम’ किंवा एन.पी.एस., जिला थट्टेने ‘नो पेन्शन स्कीम’ असेही म्हटले जाते) ज्यांना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता 35 संघटनांनी मिळून हा संप पुकारला होता.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटले!

इराणच्या 150 पेक्षा जास्त शहरांमध्ये पोलिसांच्या आणि सैन्याच्या लाठ्या, बंदुकांसमोर इराणमधील महिला आणि पुरुष हिजाबच्या सक्तीविरोधात उभे ठाकले आहेत, आंदोलनाने इराणचे “सर्वोच्च नेते”, धार्मिक राष्ट्रप्रमुख अयातुल्ला खोमेनी यांच्या सत्तेलाच आव्हान देण्याकडे वाटचाल केल्यानंतर सुसंघटित नेतृत्वाच्या आणि योग्य राजकीय दिशेच्या अभावी आंदोलनाच्या भविष्यासमोरही प्रश्न उभे आहेत.

दिल्ली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा झुंझार लढा चालूच

दिल्लीच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन इतिहासाच्या पानांवर कोरले जात आहे. ह्या संघर्षातून जगभरातील कामगार आंदोलने प्रेरणा घेत आहेत

आपल्या वाट्याचे आकाश परत मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे ?

सावित्री-फातिमाचे स्वप्न जपत, सावित्री-फातिमा यांच्या क्रांतिकारी मैत्रीच्या वारशाचे स्वतःला मशाल वाहक मानणारी ‘स्त्री मुक्ती लीग’ भांडवली चौकटीला आह्वान देत स्त्री-मुक्तीच्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहे.