मुक्काम पोस्ट: मानखुर्द-गोवंडी
कोरोना काळातील लॉकडाऊन संपून एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. तरी देखील महानगरातील कामगार वस्त्यातील भयावह चित्र अजून देखील बदललेले नाही. सरकारी दावे आणि घोषणाबाजी म्हणजे कामगारांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखेच आहे. कामगार वस्त्यांमध्ये जाऊन कामगारांचा जगण्यासाठी सुरु असलेला संघर्ष पाहिला तर याची प्रचिती येते.











