Category Archives: Slider

कविता कृष्णन: सर्वहारा वर्गाची नवीन गद्दार

सर्वहारा वर्गाशी गद्दारी करण्याचे काम दुरुस्तीवादी पक्षांचे सर्वच नेते करत असले, तरी कविता कृष्णन यांनी सीपीआय(एमएल) लिबरेशन सोडल्यापासून कम्युनिझम आणि कामगार वर्गाच्या महान शिक्षकांवर ज्या पद्धतीने उघडपणे हल्ला चढवला आहे त्यावरून हे स्पष्ट आहे की ही गद्दारी अगदी टोकाला गेली आहे. परंतु तिला या टोकापर्यंत पोहोचवण्यात तिच्या पक्षाचा मोठा हात आहे, कारण त्या पक्षानेच ते भांडवली उदारवादी वातावरण निर्माण केले ज्यामध्ये कविता कृष्णन सारखी गद्दार जवळपास तीन दशके पक्षात राहिली आणि केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरोमध्येही जवळपास दशकभर टिकून राहिली.

“भारत जोडो यात्रा” : कामगार वर्गाचे हित भांडवलदारांशी जोडणारी यात्रा!

पराजयबोध जेव्हा मनाची पकड घेतो, तेव्हा विजयाची खोटी आशा दाखवणाऱ्या कोणाचाही हात पकडावासा वाटू लागतो. देशातील उदारवाद्यांचे तेच झाले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने काढलेल्या “भारत जोडो यात्रे”मुळे देशभरातील सर्वच उदारवादी, समाजवादी हर्षोल्हासित झाले आहेत आणि जणू काही देशामध्ये मोठे परिवर्तनच येऊ घातले आहे अशा आरोळ्या ठोकत आहेत. भांडवलदारांच्या पैशातून होणारी ही यात्रा ना कोणते आमूलाग्र परिवर्तन घडवणार आहे, ना फॅसिझमला आव्हान उभे करणार आहे.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटले!

इराणच्या 150 पेक्षा जास्त शहरांमध्ये पोलिसांच्या आणि सैन्याच्या लाठ्या, बंदुकांसमोर इराणमधील महिला आणि पुरुष हिजाबच्या सक्तीविरोधात उभे ठाकले आहेत, आंदोलनाने इराणचे “सर्वोच्च नेते”, धार्मिक राष्ट्रप्रमुख अयातुल्ला खोमेनी यांच्या सत्तेलाच आव्हान देण्याकडे वाटचाल केल्यानंतर सुसंघटित नेतृत्वाच्या आणि योग्य राजकीय दिशेच्या अभावी आंदोलनाच्या भविष्यासमोरही प्रश्न उभे आहेत.

दिल्ली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा झुंझार लढा चालूच

दिल्लीच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन इतिहासाच्या पानांवर कोरले जात आहे. ह्या संघर्षातून जगभरातील कामगार आंदोलने प्रेरणा घेत आहेत

शिवसेनेच्या कामगारद्रोही इतिहासाला विसरू नका!

स्वत:ला मराठी माणसांचा, हिंदूंचा कैवारी म्हणणाऱ्या शिवसेनेचा स्थापनेपासूनचा संपूर्ण इतिहासच कामगारद्रोहाचा इतिहास आहे. वरवर मराठी कामगारांच्या हिताच्या थापा मारणाऱ्या या पक्षाने सतत सर्व कामगारांच्या हितांवर हल्ला करत बिल्डर-उद्योगपतींचे हित जपले आहे.

गोव्यातही भाजपची आमदार खरेदी!

भारतातल्या भांडवली लोकशाहीत निवडणुका, प्रचार, निवडणुकीतील धांदलेबाजी यापलीकडे नगरसेवक-आमदार-खासदारांचा घोडाबाजार म्हणजे भांडवलदार वर्गाच्या, आणि विशेषत: टाटा-बिर्ला-अंबानी-अडानी-मित्तल सारख्या बड्या भांडवलदार वर्गाच्या, हातातले ते पर्यायी शस्त्र आहे

कामगार वर्गाचा पक्ष कसा असावा? (चौथे पुष्प)

कम्युनिस्टांनी स्वत:ला कामगारांच्या आर्थिक मागण्यांपर्यंत मर्यादित करणे हाच फक्त अर्थवाद नाही, तर कामगार वर्गाशिवाय इतर जनसमुदायांच्या मागण्यांकडे डोळेझाक करणे सुद्धा अर्थवाद आहे. असे का? हे समजण्यासाठी आपल्याला कम्युनिस्ट राजकारणाचे सारतत्त्व समजावे लागेल.

22 ऑक्टोबर, क्रांतिकारी अश्फाकउल्ला खान यांच्या जन्मदिनानिमित्त

अश्फाकउल्ला खान यांना आज फक्त एका क्रांतिकारकाच्या रूपात, ज्याने भारतीय स्वातंत्र लढ्यात स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले म्हणून आठवले जाते. परंतु त्यांच्या राजकीय आणि विचारधारात्मक प्रवासाबद्दल समाजाच्या बहुसंख्य हिश्श्याला कमीच माहिती आहे. बहुसंख्य जनता आजही अश्फाक उल्लाह खान यांच्या क्रांतिकारी राजकारणासोबत परिचित नाही.

28ऑगस्ट, महान जातीविरोधी योद्धे अय्यंकालींच्या जन्मदिनानिमित्त

अय्यंकाली केरळमधील जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी  ब्राह्मणवादाविरुद्ध आणि त्याला पोसणाऱ्या सामंतवाद, ब्रिटीश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर विश्वास ठेवून क्रांतिकारी लढे उभे केले. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते.

मुंबईची हिरवीगार फुफ्फुसे ‘आरे जंगल’ उद्ध्वस्त करून, भांडवलदारांना सोपवण्याची तयारी !!

मुंबईमध्ये ‘आरे जंगल’ वाचवण्याकरिता चालू असलेल्या दुसऱ्या आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये नुकताच झळकला. या आंदोलनामध्ये प्रभावी असलेल्या उदारवादी विचारांच्या प्रभावामुळे हे आंदोलन निष्प्रभावी बनले आहे, परंतु या निमित्ताने मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल उध्वस्त करून ती जागा बिल्डर-उद्योगपतींच्या घशात घालण्याचे फडणवीस-शिंदे सरकारचे इरादे पुन्हा एकदा उघडे पडले आहेत.